पुणे – भीमा-कोरेगाव व एल्गार परिषदेचा कोणताही संबंध नाही. तसेच, आम्ही आंबेडकरवादी असल्याने चुकीच्या मार्गाने जाणार नाही. एल्गार परिषदेबाबत आठवले यांनीही पोलिसांची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) राज्य कार्यकारणी बैठकीसाठी आठवले पुण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पोलीस पुराव्यानिशी तपास करत असले तरी चौकशी केल्यास त्या प्रकरणातील सत्यता लोकांसमोर येईल, असे आठवले यांनी सांगितले.