मुंबई – चालू आर्थिक वर्षात देशातील किरकोळ वस्तूंच्या महागाईचा दर 5.3 टक्के इतका राहील असा अंदाज रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केला आहे. पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत हा दर आणखी कमी होऊन तो 5 टक्के इतका राहील असा अंदाजही आरबीआयने व्यक्त केला आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे की, महागाई दराची ही वाटचाल आमच्या अंदाजाप्रमाणेच सुरू आहे. आरबीआयने देशातील महागाई आणि विकासाच्या परिमाणाचा अभ्यास करूनच आपले वित्तीय धोरण ठरवले आहे.
केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात तसेच वॅटवरही काही प्रमाणात कपात केली आहे त्यातूनही महागाई कमी होण्यास मदत होणार आह,े असे त्यांनी म्हटले आहे.