नवी दिल्ली – भारतातील महागाई असह्य पातळीवर पोचली असल्याचे मुडीज अनालिटिक्स या जागतिक स्तरावरील आर्थिक अभ्यासक संस्थेने म्हटले आहे. इंधनांच्या भडकलेल्या दरांमुळे किरकोळ महागाईचा आलेख चढाच राहण्याची चिन्हे असल्याचे व त्यामुळे रिझर्व्ह बँकेला व्याजदरात कपात करण्यात मर्यादा पडत असल्याचेही मुडीजने नमूद केले आहे.
आशियातील अन्य देशांच्या तुलनेत भारतातली महागाई हा अपवाद असल्याचेही मुडीजने म्हटले आहे. फेब्रुवारीमध्ये भारतातील किरकोळ महागाईचा दर पाच टक्के इतका वाढला. पतधोरण निश्चित करताना रिझर्व्ह बँक प्रामुख्याने किरकोळ महागाईचा विचार करते. अन्न, खाद्यपदार्थ, इंधन व वीज यांचा समावेश नसलेला महागाईचा दर जानेवारीच्या 5.3 टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये 5.6 टक्के इतका वाढला.
हा दर असह्य पातळीवर असल्याचे मुडीजने म्हटले आहे.