मुंबई – सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक सूची यावरून देशभरात प्रचंड तांडव सुरू आहे. याच प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांनी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे.
घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीने आज (दि. ९) महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होत असून, आझाद मैदानात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे.
‘महाराष्ट्राची राजधानी घुसखोर पोखरत आहेत’ ह्या वास्तवाचं भान वेळीच आलं तर आणि तरंच हे शहर वाचू शकेल! #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/0GwjGdVQ2W
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 7, 2020
दरम्यान, याच पार्शवभूमीवर मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. “महाराष्ट्राची राजधानी घुसखोर पोखरत आहेत, ह्या वास्तवाचं भान वेळीच आलं तर आणि तरंच हे शहर वाचू शकेल” असं सांगण्यात आलं आहे.