बाघपत : मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या काँग्रेसने काल आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा सादर केला आहे. काँग्रेसने आपला जाहीरनामा सादर केल्यापासूनच भाजपच्या जेष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर तिखट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली असून काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेले मुद्दे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय घातक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
दरम्यान, आज उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला जाहीरनाम्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. योगी आदित्यनाथ आज बाघपत येथे एका जाहीर सभेमध्ये बोलताना म्हणाले की, “मला तर असं वाटत आहे की काँग्रेसमध्ये शहरी नक्षलवाद्यांनी घुसखोरी केली आहे. याचाच परिणाम आहे की, काँग्रेसद्वारे अशा हीन दर्जाचा जाहीरनामा सादर करण्यात आला आहे.”
UP CM Yogi Adityanath in Baghpat on Congress manifesto: Aisa lagta hai jaise sheheri naxaliyon ne Congress ke andar ghuspaet karke Congress party ko hi hijack kar liya ho aur aisa sharmnaak drishya desh ke saamne Congress aur uske sahyogi dal paida karna chahte hain pic.twitter.com/RiggGa6wEK
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 3, 2019