विशाखापट्टणम: कर्णधार विराट कोहलीच्या भारतीय संघाला आज येथे होत असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांत आव्हान कायम राखण्यासाठी विजय आवश्यक बनला आहे. चेन्नईतील पहिला सामना गमावल्याने हा सामना भारतीय संघासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे.
West Indies have won the toss and elect to bowl first in the 2nd ODI against #TeamIndia.#INDvWI pic.twitter.com/FoCg4VGxTe
— BCCI (@BCCI) December 18, 2019
सामन्यास थोड्याच वेळात विशाखापट्टणम येथील डाॅ. वाय. एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा वेस्टइंडिजच्या बाजूने लागला असून कर्णधार कायरन पोलार्डने क्षेत्ररक्षण स्विकारले असून भारतीय संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
दरम्यान, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-१ असा पिछाडीवर आहे. आजच्या सामन्यातील विजयासह मालिकेत बरोबरी करुन कटक येथे २२ डिसेंबरला होणारी निर्णायक लढत खेळण्यासाठी कोहली आणि कंपनी उत्सुक आहे. मात्र त्यासाठी आजच्या सामन्यात त्यांना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना रोखण्यासाठी आराखडा तयार करावा लागणार असून त्यानुसारच खेळ करावा लागणार आहे.