कटक : भारत आणि वेस्टइंडिज दरम्यान आज मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक एकदिवसीय सामना कटक येथे होणार आहे. सध्या मालिकेत १-१ अशी बरोबरी आहे. त्यामुळे आजच्या अखेरच्या तिस-या एकदिवसीय सामन्यात ‘फायनल’चा थरार बघायला मिळणार आहे.
मालिकेतील भारत-विंडीज दरम्यानच्या या निर्णायक सामन्यास थोड्यात वेळात कटक येथील बाराबत्ती स्टेडियमवर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार विराट कोहलीने क्षेत्ररक्षण स्विकारताना विंडीज संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
India have won the toss and elected to bowl against West Indies in the series-decider. #INDvWI #TeamIndia @paytm pic.twitter.com/WmlaKIKXQl
— BCCI (@BCCI) December 22, 2019
दरम्यान, गेल्या १५ वर्षात भारतीय संघाने मायदेशात सलग दोन एकदिवसीय मालिका गमावलेल्या नाहीत. हा विक्रम अबाधित राखण्यासाठी आज विंडिजविरूध्द भारताला कुठल्याही स्थितीत विजय मिळवणे आवश्यक आहे. दुसरीकडे १३ वर्षानंतर भारतात एकदिवसीय मालिका जिंकण्याची संधी विंडीजला आहे. त्यामुळे आता यामध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुकतेचे राहणार आहे.