पुणे : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची आणखी एक संधी गमावल्यानंतर, टीम इंडियाने आता आपले लक्ष एकदिवसीय मालिकेकडे वळवले आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात 19 जानेवारी रोजी पार्ल येथील बोलंड पार्क येथे होणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व केएल राहुलकडे असेल, तर जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकूण 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 10 सामन्यांत भारताला विजय मिळाला आहे. तर 22 सामने गमावले. इतर दोन सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही.
जर आपण दोन्ही संघांमधील एकूण एकदिवसीयसामन्यांवर नजर टाकली तर, भारत आणि दक्षिण आफ्रिका 84 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात भारताने 35 सामने जिंकले आहेत आणि 46 सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांचा निकाल लागला नाही.
असे असले तरी भारतीय संघाने 2017-18 मध्ये त्यांच्या मागील दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेत संस्मरणीय एकदिवसीयमालिका खेळली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने सहा सामन्यांची मालिका ५-१ अशा फरकाने जिंकली होती.
यंदाच्या दक्षि आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय मालिका सुरु होण्यापूर्वी आम्ही दक्षिण आफ्रिकेत भारताने मिळवलेल्या 3 संस्मरणीय विजयांवर प्रकाश टाकणार आहोत.
1) जोहान्सबर्ग (2011)
जानेवारी 2011 मध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मुनाफ पटेलच्या (4/29) गोलंदाजीने भारताला अविश्वसनीय विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताला केवळ 190 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिका 33व्या षटकात 4 बाद 152 धावांवर असताना ग्रॅम स्मिथ 77 धावांवर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. या वेगवान गोलंदाजाने मॉर्न मॉर्केल (6) आणि वेन पारनेल (12) यांना बाद करून भारताने सनसनाटी विजय मिळवला. 5 बाद 160 वरून यजमानांची निर्धारीत 50 षटकांत 189 अशी अवस्था झाली.
युवराजच्या 53 आणि कर्णधार एमएस धोनीच्या 38 धावांच्या जोरावर भारताच्या एकूण 190 धावा झाल्या होत्या. तथापि, खालच्या फळीला फारसे योगदान देता आले नाही. लोनवाबो त्सोत्सोबे 22 धावांत 4 बळींसह भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते.
2) सेंच्युरियन (2001)
ऑक्टोबर 2001 मध्ये तिरंगी मालिकेच्या तिसर्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर सेन्चुरियनमध्ये आणखी एक शानदार विजय नोंदवला. दर्जेदार दक्षिण आफ्रिकेच्या संघाविरुद्ध भारताचा हा सर्वोत्तम विजयांपैकी एक विजय होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 233 धावा केल्या. राहुल द्रविडने सर्वाधिक 54 धावा केल्या तर युवराज सिंग (42), सचिन तेंडुलकर (38) आणि वीरेंद्र सेहवाग (33) यांनी उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर गोलंदाजांनी आपली भूमिका निभावत दक्षिण आफ्रिकेला 46.2 षटकात 192 धावांवर गारद केले. आणि भारताने 41 धावांनी विजय नोंदवला.
भारताकडून हरभजन सिंगने 27 धावांत 3 बळी घेतले. त्याने जॅक कॅलिस, शॉन पोलॉक आणि निकी बोजे यांना बाद केले. अजित आगरकर, अनिल कुंबळे आणि वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लान्स क्लुसनर (44) आणि मार्क बाउचर (38) यांनी दक्षिण आफ्रिकेला 5 बाद 85 अशा स्थितीतून सावरण्यास मदत केली, परंतु त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.
3 केप टाउन (2011)
जानेवारी २०११ मध्ये केपटाऊनमध्ये झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर दोन गडी राखून विजय मिळवला. २२१ धावांचा पाठलाग करताना पाहुण्यांचा निम्मा संघ ९३ धावांवर माघारी परतला होता. रोहित शर्मा, कोहली, एम.एस. धोनी आणि युवराज सिंग यांना काही खास कामगिरी करता आली नाही. मात्र, युसूफ पठाण (59) आणि सुरेश रैना (37) यांनी सहाव्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. हरभजन सिंगनेही नाबाद 23 धावा करत कारण भारताला 10 चेंडू बाकी असताना विजय मिळाला.
गोलंदाजीच्या आघाडीवर झहीर खानने 43 धावांत 3 गडी बाद केले, तर मुनाफ पटेल आणि हरभजनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. दरम्यान, युसूफ पठाणने एबी डिव्हिलियर्सची (16) मोठी विकेट घेतली. फाफ डू प्लेसिस (६०) आणि जीन-पॉल ड्युमिनी (५२) यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी उपयुक्त खेळी केली.