गुवाहटी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिला सामना गुवाहटी येथील बारसापारा स्टेडियमवर होणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना श्रीलंकेस प्रथम फलंदाजीस पाचारण केल आहे. पण नाणेफेकीनंतर सामना सुरू होण्याआधीच पावसाचा व्यत्यय आल्यांन सामना सुरू होण्यास विलंब होणार आहे.
The start of #INDvSL has been delayed due to rain. https://t.co/DFDWD5WiXx
— ICC (@ICC) January 5, 2020
दरम्यान, मैदानावरील कर्मचा-यांनी खेळपट्टी झाकली आहे. पाऊस थांबला असून ८.१५ वाजता पंच खेळपट्टी व मैदानाचं परिक्षण करून सामन्याविषयी निर्णय घेणार आहेत.
Update – It has stopped raining and we will have an inspection at 8.15 PM IST.
Stay tuned #INDvSL
— BCCI (@BCCI) January 5, 2020
भारताने नुकतीच विंडीज विरूध्दची टी-२० आणि वन-डे मालिका जिंकली आहे. हा विजयी धडाका कायम राखण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा १७ वा टी-२० सामना असून, यापूर्वी १६ टी-२० सामन्यांत भारताने ११ तर श्रीलंकेने ५ विजय नोंदविले आहेत.