गुवाहटी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० क्रिकेट मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. भारताने नुकतीच विंडीजविरूध्दची टी-२० आणि वन-डे मालिका जिंकली आहे. हा विजयी धडाका कायम राखण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा १७ वा टी-२० सामना असून, यापूर्वी १६ टी-२० सामन्यांत भारताने ११ तर श्रीलंकेने ५ विजय नोंदविले आहेत.
भारत-श्रीलंका दरम्यानच्या तीन टी-२० क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यास गुवाहटीतील बारसापारा स्टेडियममध्ये थोड्याच वेळात सुरूवात होणार अाहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला अाहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने क्षेत्ररक्षण स्विकारताना श्रीलंकेस प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Captain @imVkohli has won the toss and elects to bowl first in the 1st @Paytm T20I against Sri Lanka.#INDvSL pic.twitter.com/V2a6ujWHrK
— BCCI (@BCCI) January 5, 2020
दरम्यान, ऑकटोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये यावर्षी टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असून त्यादृष्टीने सर्वच संघाची बांधणी सुरू आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारताला एकूण १५ टी-२० सामने खेळायला मिळणार असून नव्या वर्षातल्या हंगामाचा शुभारभंही टी-२० लढतीने होत आहे, हा दोन्ही संघासाठी अतिरिक्त लाभच म्हणावा लागेल.