गुवाहटी : येथील बरसापरा मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्याच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळं रद्द झाला आहे.
Not the news that we would want to hear, but the 1st T20I between India and Sri Lanka has been abandoned due to rain.
See you in Indore #INDvSL pic.twitter.com/72ORWCt2zm
— BCCI (@BCCI) January 5, 2020
नाणेफेक जिंकून भारताने क्षेत्ररक्षण स्विकारल होत, पण त्यानंतर २५ मिनिटानं जोरदार पाऊस सुरू झाला आणि निर्धारित वेळेत सामना सुरू होऊ शकला नाही. त्यानंतर ८.१५ वाजता मैदानाचे निरीक्षण करण्यात आलं. पण हा वेळ आणखी ४५ मिनिटानं वाढविण्यात आला.
Update – It has stopped raining and we will have an inspection at 8.15 PM IST.
Stay tuned #INDvSL
— BCCI (@BCCI) January 5, 2020
त्यानंतर ९ वाजता मैदानाचं निरीक्षण केलं असता पंचानी पुन्हा अर्ध्या तासांनी निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला.
The waiting game continues. Next inspection at 9 PM IST.#INDvSL https://t.co/53G5EicMe7
— BCCI (@BCCI) January 5, 2020
त्यानंतर ९.३० वाजता तिस-यांदा मैदानाचं पंचानी निरिक्षण केलं. पावसामुळं मैदानाची परिस्थिती पाहता नियमानुसार पाच-पाच षटकांचा सामना होऊ शकत नसल्यान दोन्ही पंचानी मैच रेफरी डेविड बून यांच्याशी चर्चा करून अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Next inspection at 9.30 PM IST.
*fingers crossed* pic.twitter.com/pT5wf61yiV
— BCCI (@BCCI) January 5, 2020
आजचा सामना रद्द झाल्यानं चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. आता मालिकेतील दुसरा टी-२० सामना ७ जानेवारीला इंदूर येथे रंगणार आहे.