सेंच्युरीयन – भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याचा सोमवारी दुसरा दिवस संततधार पावसाने वाया गेला. संततधार पावसामुळे सोमवारी एकाही षटकाचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे खेळपट्टीवरील कव्हरही हटवले गेले नाही.
पहिल्या दिवसअखेर भारताने सलामीवीर लोकेश राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर आपल्या पहिल्या डावात 3 गडी गमावून 272 धावा केल्या होत्या. मयंक आग्रवाल 60, कर्णधार विराट कोहली 35 धावा करून बाद झाल्यावर अजिंक्य रहाणेने राहुलला साथ देत नाबाद 40 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्याला अर्धशतकाची संधी होती.
Rain has forced play to be called off on Day 2 in Centurion.#WTC23 | #SAvIND pic.twitter.com/81iymNCus4
— ICC (@ICC) December 27, 2021
मात्र, संततधार पावसाने खेळ सुरू होऊ शकला नाही. पहिल्या दिवसअखेर राहुल 122 धावांवर रहाणेसह खेळत आहे.