पोटचेफ्स्टूम : चार वेळचा विश्वविजेता भारतीय संघ १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य लढतीत आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूध्द खेळणार आहे. या सामन्यात बाजी मारून सलग तिस-यांदा अंतिम फेरी गाठण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य राहील.
या हायव्होल्टेज सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा पाकिस्तानच्या बाजूने लागला आहे. पाकिस्तानचा कर्णधार रोहेल नजीर याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Pakistan win the toss and elect to bat first in their semi-final clash against India!#U19CWC | #INDvPAK | #FutureStars pic.twitter.com/fDZWCmI7ef
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 4, 2020
दरम्यान, या स्पर्धेत दोन्ही संघ उपांत्य फेरीपर्यतच्या वाटचालीमध्ये अपराजित असले तरी आजचा सामना जिंकणारा संघच अंतिम फेरी गाठू शकणार आहे.