दुबई – आशिया करंडक ( #AsiaCup2022 ) स्पर्धेला सुरुवात झाली असून भारत आणि पाकिस्तान ( #INDvPAK ) यांच्यातील महामुकाबला काहीच वेळात सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ पुन्हा एकदा मोठ्या आव्हानासाठी सज्ज आहे. तसेच या सामन्यात सर्वांच्या नजरा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे असणार आहे.
दोन्ही संघ जवळपास 10 महिन्यांनंतर एकमेकांशी खेळत आहेत. या सामन्यात टीम इंडियाला गेल्या वर्षी 10 विकेट्सनी झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. दोन्ही संघांचे प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे ही स्पर्धा खेळत नाहीत. असे असूनही हे दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दुबईच्या मैदानावर होणारा हा सामना जिंकणारा संघ चॅम्पियन बनण्याच्या दिशेने एक पाऊल टाकेल.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा ( #Toss ) कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत पाकिस्तान संघास फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे.
Toss update from the big fixture at #AsiaCup2022 ⬇️
India win the toss and opt to bowl first 🏏#INDvPAK | 📝 Scorecard: https://t.co/mKkZ2s5RKA pic.twitter.com/NnWgUa8Pfi
— ICC (@ICC) August 28, 2022
दोन्ही संघ जवळपास 10 महिन्यांनंतर एकमेकांशी खेळत आहेत. या सामन्यात टीम इंडियाला गेल्या वर्षी 10 विकेट्सनी झालेल्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. दोन्ही संघांचे प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे ही स्पर्धा खेळत नाहीत. असे असूनही हे दोन्ही संघ विजेतेपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दुबईच्या मैदानावर होणारा हा सामना जिंकणारा संघ चॅम्पियन बनण्याच्या दिशेने एक पाऊल टाकेल.