वेलिंग्टन : मनीष पांडेच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी १६६ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताने या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
An enterprising fifty from Manish Pandey helps India post 165/8 after early wickets.
Can New Zealand chase this down?#NZvIND pic.twitter.com/xnQ6vmcyVA
— ICC (@ICC) January 31, 2020
न्यूझीलंड कर्णधार टीम साउदीने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. त्यानंतर भारताने फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १६५ धावा केल्या. भारताकडून मनीष पांडेने ३६ चेंडूत ३ चौकारासह नाबाद ५०, लोकेश राहुलने २६ चेंडूत ३ चौकार व २ षटकारासह ३९, शार्दुल ठाकुरने १५ चेंडूत २०, विराट कोहलीने ९ चेंडूत ११, शिवम दुबेने ९ चेंडूत १२ आणि नवदीप सैनीने ९ चेंडूत नाबाद ११ धावांची खेळी केली. संजू सॅमसन ८, श्रेयस अय्यर १ धाव काढून झटपट बाद झाले.
न्यूझीलंडकडून ईश सोढीने ४ षटकांत २६ धावा देत ३ गडी तर हेमिश बेनेटने ४ षटकात ४१ धावा २ गडी बाद केले. तर मिशेल सॅटनर, स्काॅट कुग्गलिन आणि टीम साउदीने प्रत्येकी १ गडी बाद केला.