चेन्नई – इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामन्यात सुरुवातीला रोहित शर्माचे दिडशतक आणि त्यानंतर रविचंद्रन अश्विनच्या पाच विकेटच्या बळावर भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने इंग्लंडवर 249 धावांची आघाडी घेतली आहे. भारताने दुसऱ्या डावाची सुरुवात केली असून दिवसअखेर भारताने एक विकेट गमावून 54 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 25 तर चेतेश्वर पुजारा 7 धावांवर नाबाद आहेत.
https://www.facebook.com/edainikprabhat/posts/1471014743238226
तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 329 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताने इंग्लंडला 134 धावांवर ऑल आउट केले. आर. अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावत 5 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे दिवसभरात तब्बल 15 विकेट पडल्या.