अहमदाबाद – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी -20 सामन्यात भारतीय संघाचा लेग स्पीन गोलंदाज युजवेंद्र चहलने एक गडी बाद करताना टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू बनला आहे.
चहलने जसप्रीत बुमराहचा 59 बळींची कामगिरी मागे टाकत 60 वा बळी नोंदवला. चहलने 46 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 60 बळी घेतले आहेत. टी -20 सामन्यात 5 बळी घेण्याचीही कामगिरी चहलच्या नावावर आहे.
टी -20 सामन्यात भारताकडून सर्वाधिक बळी
युजवेंद्र चहल – 60 बळी
जसप्रीत बुमराह – 59 बळी
रविचंद्रन अश्विन – 52 बळी
भुवनेश्वर कुमार – 41 बळी
कुलदीप यादव – 39 बळी
रवींद्र जडेजा – 39 बळी
हार्दिक पंड्या – 38 बळी