चेन्नई – पहिल्या कसोटीत दारूण पराभव पत्करल्यानंतर आता आजपासून इंग्लंडविरुद्ध येथेच सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्याचेच आव्हान भारतीय संघासमोर उभे ठाकले आहे. नवोदित शाहबाज नदिम याच्या जागी अक्सर पटेल याचा अंतिम संघात समावेश होण्याची शक्यता असून हाच एकमेव बदल संघात अपेक्षित समजला जात आहे.
पहिल्या कसोटी भारताच्या फलंदाजांना आलेले अपयश अद्याप संघासाठी चिंतेची बाब ठरत असून यातून बाहेर येत पहिल्या पाचही अनुभवी फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी केली तर यजमान संघआव्हान उभेकरु शकतो. पहिल्या कसोटीतील खेळपट्टीवरूनप्रचंड टीका झाल्यावर आता या खेळपट्टीवर खूप मेहनतघेतली गेली असून लाईट रोलरचाही वापर करण्यात आला आहे. त्यामुळे खेळपट्टीवरील दव काही प्रमाणातकायम राहणार असून त्याचा लाभ पहिले दोन दिवस फलंदाजांसह गोलंदाजांनाही मिळणार आहे. परंपरेनूसार ही खेळपट्टी नंतरचे तिनही दिवस फिरकी गोलंदाजांनाच मदत करेल अशी शक्यता बळावली आहे.
जेम्स ऍण्डरसन व जोफ्रा आर्चर यांनी पहिल्या कसोटीत फिरकी गोलंदाज जॅक लिचसह भारतीय फलंदाजांवर वर्चस्व राखले होते. या सामन्यात जोफ्रा आर्चरला दुखापतने सहभागी होत येणार नसले तरीही स्टुअर्ट ब्रॉडच्या समावेशाने त्यांची गोलंदाजी जास्तच भक्कम बनली आहे. त्यामुळे याही सामन्यात त्यांच्या समोर भक्कम खेळ करण्याची भारतीय फलांजांकडून अपेक्षा आहे.
इंग्लंडच्या संघाने या दौऱ्यावर येण्यापूर्वी श्रीलंकेचा दौरा केला होता व त्यात निर्विवाद विजयही मिळवला होता. त्यामुळे त्यांनी आशियाई विशेषतः फिरकीला साथ करत असलेल्या खेळपट्टीवर खेळण्याचा चांगला सराव भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी केला होता त्यामुळेच त्यांनी पहिल्या कसोटीत वर्चस्व राखण्यात यश मिळवले. त्यांचा कर्णधार व मधल्या फळीतील अव्वल फलंदाज ज्यो रूट याने तर पहिल्या सामन्यात पहिल्याडावात अफलातूनद्विशतकी खेळी केल्यामुळेच त्यांना मोठी धावसंख्या उभारत भारतावर दडपणटाकता आले. याही सामन्यात त्याच्याकडून अशाच खेळाची त्यांना आशा आहे. तर दुसरीकडे भारताच्या गोलंदाजांना रूटला लवकर बाद करण्यात यश आले तरच सामन्यावर नियंत्रण राखणे शक्य होईल.
इंग्लंड संघात चार मोठे बदल….
भारताविरुद्धच्या या सामन्यासाठी इंग्लंड संघात चार मोठे बदल करण्यात आले आहेत. बेन फोक्स, ख्रिस वोक्स, ऑलि स्टोन व मोईन अली यांचा बारा खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला आहे. फोक्सला जोस बटलरच्या जागी संघात गेण्यात आले असून पहिल्या सामन्यानंतर बटलर मायदेशी परतणारहे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. तसेच वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला दुखापत झाल्यामुळे स्टुअर्ट ब्रॉड याचाही अंतिम संघात समावेश होण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
पहिल्या कसोटीत दुसऱ्या डावात रवीचंद्रन अश्विननेसहा गडी बाद केले मात्र, हीच कामगिरी त्याला आता या सामन्यात पहिल्याच डावात करता आली तरच ते संघासाठी लाभदायक ठरेल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडून असलेल्या अपेक्षा पहिल्या सामन्यात तरी पूर्णझाल्या नाहीत त्यामुळे या सामन्यात नव्या चेंडूवर त्याचा पुन्हा एकदा कस लागणार आहे. त्याच्या जोडीला इशांत शर्मायाला देखील इंग्लंडचे पहिले चार फलंदाज लवकर कसे बाद करता येतील याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. इशांतला पहिल्या कसोटीत आलेले अपयश पाहता ब्रिस्बेन कसोटीतील कामगिरीच्या आधारे महंमद सिराजची अनपेक्षित निवड होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
कोहली-रोहितवर मदार
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा यांना गेल्या संपूर्ण मोसमात दर्जाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या मालिकेतही रोहितला पहिल्या सामन्यात धावा करता आल्या नाहीत. कोहलीने पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात 72 धावांची खेळी केली होती मात्र, भारताच्या या रनमशीनकडून त्यापेक्षाही मोठ्या खेळीची संघाला गरज आहे.
फिरकी गोलंदाजीमध्ये संघात तिन गोलंदाज खेळवण्याकडेच कल राहिल. त्यात रवीचंद्रन अश्विन वॉशिंग्टन सुंदर व पूर्ण तंदुरुस्त ठरलेला अक्सर पटेल यांचे स्थान निश्चित मालले जात असले तरीही इंग्लंडचे फलंदाज डावखुरी फिरकी खेळताना गडबडतात हे लक्षात घेता कुलदीप यादवलाही संधी मिळू शकते. मात्र, गोलंदाजीसह फलंदाजीचाही निकष लावला गेला तर कुलदीपच्या ऐवजी पटेललाच संधी मिळण्याची शक्यता जास्त राहिल.
भारताची फलंदाजी सशक्त मानली जात असली तरीही पहिल्या कसोटीत शुभमन गिल व कर्णधार कोहली वगळताअन्य एकाही फलंदाजाला इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखता आलेले नाही. चेतेश्वर पुजारा, यष्टीरक्षक ऋषभ पंत व अश्विन यांनी संयमी फलंदाजी केली असली तरीही त्यांना संघाचा पराभव टाळता आलेला नाही. त्यामुळे पहिल्या पाच प्रमुख फलंदाजांवरच भारताची भिस्त राहणार आहे. त्यातही कोहलीची इंग्लंडविरुद्ध मायदेशातील कामगिरी तगडी असल्यामुळे तोच भारताचा एक्का असेल. रोहित शर्माच गिलसह डावाची सुरूवात करेल. त्यानंतर चेतेश्वर पुजारा, कोहली, अजिंक्य रहाणे अशी मधली फळी असेल. त्यानंतर पंतच्या कामगिरीकडेही लक्ष राहील.
इंग्लंडच्या संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांनी पहिल्या कसोटीत फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात भारतापेक्षा सरस कामगिरी केली आहे. पहिलाच सामना जिंकल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला असून याही सामन्यात विजय मिळवत मालिकेत भक्कम आघाडी घेण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्यांच्या फलंदाजीचा मुख्य भार जरी कर्णधार ज्यो रूटवर राहणार असला तरीही त्यांना ऑलिव्हर पोप, डॉमनिक सिबली व रोरि बर्न यांच्यासह कर्णधार ज्यो रूट व जोस बटलर, डॅनियल लॉरेन्स आणि अष्टपैलु बेन स्टोक्स यांच्याकडूनही भक्कम कामगिरीची अपेक्षा आहे.