अहमदाबाद – इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन टी-20 सामन्यांसाठी जर संघ समतोल साधायचा असेल व संघात नवोदित खेळाडूंना संधी द्यायची असेल तर कर्णधार विराट कोहलीलाच विश्रांती द्या, असे परखड मत माजी कसोटीपटू व समालोचक आकाश चोप्रा याने व्यक्त केले आहे.
पहिल्या पाच ते सात षटकांतच प्रतिस्पर्धी संघावर दडपण राखण्यासाठी रोहितच्या आक्रमक फलंदाजीमुळेच गती येइल. त्याच्या जोडीला किशनसारखा नवोदित असेल तर त्यालाही कोणतेही दडपण न घेता फलंदाजी करता येइल. सध्या संघात रोहितनंतर शिखर धवन व लोकेश राहुल हे दोन सलामीवीर आहेत पण त्यांनी साफ निराशा केली आहे.
रोहितला पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती का देण्यात आली हे अद्याप समजलेले नाही पण जर आता त्याला संघात घेतले आहे तर कोहलीलाच विश्रांती द्या, असेही चोप्रा म्हणाले. रोहितला संघात स्थान दिले तर राहुलला संघाबाहेर जावे लागेल.