इंदूर: बांगलादेश विरूध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने मयांक अग्रवालच्या दमदार व्दिशतकाच्या जोरावर कसोटीच्या पहिल्या डावात दुस-या दिवसअखेर ६ बाद ४९३ धावांपर्यत मजल मारली आहे. तसेच ३४३ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे.
दुस-या दिवशी १ बाद ८६ धावसंख्येवरून भारताने डावाला सुरूवात केली. त्यानंतर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पूजारा यांनी अर्धशतके पूर्ण केली. भारताची धावसंख्या १०५ पोहचली असता पूजारा ५४ धावांवर बाद झाला. त्यानंतर फलंदाजीस आलेला भारतीय कर्णधार विराट कोहलीही शून्यावर बाद झाला. पण मयांक अग्रवालने रहाणेच्या साथीनं डाव सावरत भारतीय संघाला मोठ्या धावसंख्येच्या दिशेंन नेलं. अंजिक्य रहाणे ८६ धावांवर बाद झाला, तेव्हा भारताची धावसंख्या ३०९ अशी होती.
That will be Stumps on Day 2 #TeamIndia 493/6, lead by 343 runs.
What a day this has been for our team.
Scorecard – https://t.co/0aAwHDwHed #INDvBAN pic.twitter.com/GESdQcy7hh
— BCCI (@BCCI) November 15, 2019
बांगलादेशी गोलंदाज मेहदी हसनच्या गोलंदाजीवर १९६ धावांवर खेळत असताना मयांकने खणखणीत षटकार खेचत कारकिर्दीतील दुसर व्दिशतक ठोकले. व्दिशतक झळकवल्यानंतर फटकेबाजीच्या प्रयत्नात मयांक २४३ धावांवर झेलबाद झाला. मयांकने ३३० चेंडूत २४३ धावा केल्या, या खेळीत त्याने २८ चौकार व ८ षटकार ठोकले.
मयांक बाद झाल्यानंतर जाडेजा आणि उमेश यादवने तूफान फटकेबाजी करत भारतीय संघाला आणखी मजबूत स्थितीत पोहचवले. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा रविंद्र जडेजा ६० तर उमेश यादव २५ धावांवर खेळत होते. आज बांगलादेशकडून गोलंदाजीत अबू जायेदने ३(पूजारा,कोहली, रहाणे) असे महत्वपूर्ण गडी बाद केले. तर मेहिदी हसन (मयांक) आणि एबादत यांनी (वृध्दिमान साहा) प्रत्येकी १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्विकारली होती. बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांमध्ये आटोपला होता. भारताकडून गोलंदाजीत शमीने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर यादव, इशांत शर्मा आणि आश्विनने प्रत्येकी २ गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने पहिल्या डावात दिवसअखेर १ बाद ८६ धावापर्यत मजल मारली होती.