राजकोट : सलामीवीर शिखर धवन, विराट कोहली आणि लोकेश राहुलच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुस-या सामन्यात आॅस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३४१ धावांचे आव्हान ठेवले आहे. पहिला सामना जिंकून आॅस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्याने भारतासाठी आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे.
Innings Break!#TeamIndia post a formidable total of 340/6 (Dhawan 96, Kohli 78, Rahul 80) on the board.
Over to the bowlers now.#INDvAUS pic.twitter.com/QpZ2n8NBFV
— BCCI (@BCCI) January 17, 2020
आॅस्ट्रेलियन कर्णधार अॅरन फिंचने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते त्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ६ बाद ३४० धावा केल्या. भारताची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवनने पहिल्या विकेटसाठी ८३ चेंडूत ८१ धावा जोडल्या. जम्पाने रोहित ४२(४४) धावांवर बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर कोहली आणि धवनने दुस-या विकेटसाठी ९२ चेंडूत १०३ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या १८४ पर्यंत नेली. केन रिचर्डसनने धवनला स्टार्ककरवी झेलबाद करत दुसरा धक्का दिला. धवनने ९० चेंडूत १३ चौकार व १ षटकारांसह ९६ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीस आलेला श्रेयस अय्यर केवळ ७ धावांवर बाद झाला. जम्पाने त्याला त्रिफळाचित केलं.
त्यानंतर कोहलीने राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी ६३ चेंडूत ७८ धावांची भागिदारी केली. एडम जम्पाने स्टार्ककरवी कोहलीला झेलबाद केलं. कोहलीने ७६ चेंडूत ६ चौकारासह ७८ धावा केल्या. त्यानंतर आजच्या सामन्यात संधी दिलेल्या मनीष पांडेला खास कामगिरी करता आली नाही आणि तो २ धावांवर बाद झाला. त्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये राहुलने रविंद्र जडेजासोबत सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूत ५८ धावांची भागिदारी करत संघाची धावसंख्या ३३८ पर्यंत नेली. राहुलने ५२ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. मोहम्मद शम्मीने नाबाद १ आणि रवींद्र जडेजाने नाबाद २० धावा करत ५० षटकांत संघाची धावसंख्या ३४० पर्यंत नेली. आॅस्ट्रेलियाकडून एडम जम्पाने सर्वाधिक ३ तर केन रिचर्डसनने २ गडी बाद केले.