राजकोट : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा आज आॅस्ट्रेलियाविरूध्द दुसरा एकदिवसीय सामना होत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बरोबरी करण्यासाठी हा सामना ‘करो या मरो’ अशा स्थितीत आहे.
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम दुस-या सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा आॅस्ट्रेलियाच्या बाजूनं लागलं आहे. कर्णधार अॅरन फिंचने गोलंदाजी (क्षेत्ररक्षण) स्विकारून भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Australia wins the toss and elects to bowl first in the 2nd ODI against #TeamIndia.#INDvAUS pic.twitter.com/VJk8YB30P7
— BCCI (@BCCI) January 17, 2020
दरम्यान, राजकोट मधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारताने आधीच्या दोन्ही एकदिवसीय लढती गमावल्या आहेत. यामध्ये पहिला एकदिवसीय सामना २०१३ मध्ये इंग्लंडविरूध्द तर दुसरा सामना २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूध्द झाला होता.