बेंगळुरू : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना होणार आहे. यासाठी दोन्ही संघ सज्ज असून मालिका ताब्यात घेऊन आपला दबदबा असल्याचे दाखविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
बेंगळुरूतील चिन्नस्वामी स्टेडियममध्ये थोड्याच वेळात सामन्यास सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा आॅस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आहे. कर्णधार अॅरन फिंचने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Make it three in a row. Aaron Finch wins the toss and elects to bat first against #TeamIndia in the decider.#INDvAUS pic.twitter.com/HWTbtY7Etx
— BCCI (@BCCI) January 19, 2020
दरम्यान, भारत-आॅस्ट्रेलिया या संघांत भारतात होत असलेली ही दहावी एकदिवसीय मालिका आहे. त्यात पाच वेळा आॅस्ट्रेलियाने तर चार वेळा भारताने मालिका जिंकल्या आहेत. तसेच चिन्नस्वामी स्टेडियममध्ये भारत-आॅस्ट्रेलिया हे संघ आतापर्यंत एकदिवसीय सामन्यामध्ये सात वेळा आमनेसामने आले आहेत. त्यात ४ लढती भारताने तर २ लढती आॅस्ट्रेलियाने जिंकल्या. तसेच, एका लढत पावसामुळे अनिर्णित राहिली आहे