बाली – आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग तीन स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने निराश झाले असले तरीही यातून खूप काही शिकायला मिळाले, अशा शब्दात भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हीने आपले मत व्यक्त केले.
इंडोनेशियात झालेल्या सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात तसेच दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेतही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या मोसमात सिंधूला या दोन सिरीज स्पर्धांसह एकूण तिसऱ्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.
त्यामुळे तीच्यावर टीकाही होत आहे. त्यामुळे सिंधूने निराशा व्यक्त केली आहे. यंदा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूने पदक जिंकले मात्र, त्यानंतर तीला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे.