बीजिंग – चीनने भारताइतकेच सैन्य सीमेवर तैनात केले आहे. हिवाळ्याच्या कालावधीत युद्ध पेटले तर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) भारतीय सैन्यावर भारी पडेलच; शिवाय चीनला हे युद्ध कोणत्याही (राजकीय, सामरीक आणि व्यापार) पातळीवर परवडणारे असणार नाही, असा दावा ग्लोबल टाईम्सने केला आहे. त्यानंतर पूर्व लडाखमधील सुरू असलेला सीमावाद परस्पर वाटाघाटीद्वारे सोडवण्यास भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे. या प्रकरणी अंतिम तोडगा निघत नाही होईपर्यंत आघाडीवर दोन्ही देश अधिक संयम राखतील.
भारताशी पुढे वाटाघाटी सुरू राहतील. आठव्या फेरीच्या कोअर कमांडर बैठकीनंतर सीमेवरील तणाव कमी करण्याबाबत भारत आणि चीनने सहमती दर्शविली आहे. दोन्ही देशांनी हे संयुक्त निवेदन जारी केलं आहे. गैरसमज दूर करणं आणि आपापल्या सैन्याला संयम ठेवण्यास सांगतील. दोन्ही देश सीमेवरील लढाऊ वाहनं आणि सैनिक हटवतील, असं चीनच्या राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.
संवाद आणि संचार कायम ठेवून दोन्ही देश मतभेद वाढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत’, असं नॅशनल स्ट्रॅटेजी इन्स्टिट्यूटच्या रिसर्च विभागाचे संचालक कियान फेंग म्हणाले. चर्चेच्या सातव्या आणि आठव्या फेरीच्या निकालांनी दोन्ही बाजूंनी परस्पर कराराद्वारे हा विषय निकाली काढण्यास हमी दिल्याचं चीनी विश्लेषकांनी सांगितलं. दोन्ही देश चर्चेद्वारे हा वाद मिटवण्यावर सहमत झाले आहेत. आपल्या उच्च अधिका-यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे.
भारत आणि चीनदरम्यान अनेक वर्षांचा सीमावाद असून एकूण सुमारे 3,800 किमी लांवीच्या सीमाप्रदेशात अनेक ठिकाणी चीनने भारताच्या हद्दीत आक्रमण केल्याचे दिसून आले होते. जर सीमावाद संपवण्यात यश आले, तर दोन्ही देशांचा सामरिक खर्च वाचेल आणि तो निधी विकासकामांवर खर्च करता येऊ शकेल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.