नगर -कॉंग्रेस चळवळीत धाडसी व्यक्तीमत्व म्हणून इंदिरा गांधी यांचे नेतृत्व होते. स्वातंत्र्यानंतर देशाला सक्षम बनविण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच जगात भारताविषयी वेगळी प्रतिमा निर्माण झाली, असे प्रतिपादन शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी केले.
नगर शहर व भिंगार कॉंग्रेसने इंदिरा गांधी जयंती साजरी केली. यावेळी ते बोलत होते. ऍड.आर.आर.पिल्ले, पक्षाचा मायनॉरटीचे प्रदेश सरचिटणीस फिरोज खान व्यासपीठावर होते. प्रारंभी गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी फिरोज खान, अनिल परदेशी आदी उपस्थित होते.