मुंबई – नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरू झाली आहेत. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशभरात होत असलेल्या घडामोडींवर बॉलिवूड अभिनेता ‘हृतिक रोशन’ने ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं आहे.
हृतिकने पोस्टमध्ये लिहिलं की, “एक पालक आणि भारतीय नागरिक म्हणून मी आपल्या देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये असलेल्या अशांततेमुळे फार दु:खी आहे. लवकरात लवकर याठिकाणी शांतता प्रस्थापित व्हावी अशी मी आशा करतो. मी जगातील सर्वांत तरुण लोकशाहीला अभिवादन करतो”. असं सूचक ट्विट हृतिकने केलं आहे.
As a parent and a citizen of india , I am deeply saddened by the unrest across various educational institutions of our country. I hope and pray for peace to return as soon as possible. Great teachers learn from their students. I salute the worlds youngest democracy.
— Hrithik Roshan (@iHrithik) December 18, 2019