नवी दिल्ली – भारतीय संघाचा जुलै महिन्यात होत असलेला श्रीलंकेचा दौरा रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत. जगभरात करोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत असल्यामुळेच हा दौरा रद्द होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यात तीन एकदिवसीय तसेच तीन टी-20 सामने खेळणार होता. यामध्ये दोन टी-20 सामने वाढवावेत, असा प्रस्ताव श्रीलंका क्रिकेट मंडळाने बीसीसीआयसमोर ठेवला होता.
मात्र, आता श्रीलंकेत करोनाच्या रुग्णांमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यामुळे हा दौरा खेळवायचा की नाही, या संभ्रमात श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ आहे. त्यामुळे या परिस्थितीमध्ये सामने कसे खेळवायचे, हा प्रश्न श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाला पडला आहे.