नवी दिल्ली – भारतात कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 14 लाखाहून अधिक झाली आहे. देशात आतापर्यंत 14 लाख 27 हजार 005 रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण बरे होण्याचा दरात सातत्याने सुधारणा होत असून तो आता 68.32 टक्के झाला आहे. कोरोना प्रकरणात मृत्यू दराचे प्रमाण 2.04 टक्के आहे. देशात आतापर्यंत 42 हजार 518 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
India’s total recoveries cross 14.2 lakhs as recovery rate continues to improve, stands at 68.32% today. National case-fatality rate has further dipped to 2.04%: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/F7WO4c5hWI
— ANI (@ANI) August 8, 2020
दरम्यान, गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. काल दिवसभरात देशात तब्बल 933 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय एका दिवसात जवळजवळ 61 हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. देशात मागील काही दिवसांपासून दररोज 50 हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत.
भारत में पिछले 24 घंटों में #COVID19 के 61,537 मामले सामने आए हैं और 933 मौतें हुई हैं। कुल पॉजिटिव मामलों की संख्या 20,88,612 हो गई है, जिसमें 6,19,088 सक्रिय मामले, 14,27,006 ठीक / डिस्चार्ज / विस्थापित और 42,518 मौतें शामिल हैं : स्वास्थ्य मंत्रालय pic.twitter.com/6JGIAf5SyC
— ANI_HindiNews (@AHindinews) August 8, 2020
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशात एकूण 20,88,612 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 42,518 रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.
#Coronawatch India
✅देशात बरे झालेले रुग्ण सक्रिय रुग्णांपेक्षा 2.3 पटीने जास्त
✅ महाराष्ट्रात बरे झालेले रुग्ण सक्रीय रुग्णांपेक्षा 2.2 पटीने जास्त
✅ 8 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 1000 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण #IndiaFightsCorona pic.twitter.com/XcgOrjxnw2
— PIB in Maharashtra 🇮🇳 (@PIBMumbai) August 8, 2020
करोना वाॅच :
देशात बरे झालेले रुग्ण सक्रिय रुग्णांपेक्षा 2.3 पटीने जास्त
महाराष्ट्रात बरे झालेले रुग्ण सक्रीय रुग्णांपेक्षा 2.2 पटीने जास्त
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात 1000 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण