ब्युनोस आयर्स – कर्णधार व अव्वल खेळाडू राणी रामपाल हिने केलेल्या महत्त्व व पूर्ण गोलच्या जोरावर भारताच्या महिला हॉकी संघाने यजमान अर्जेंटिनाशी 1-1 अशी बरोबरी करण्यात यश मिळवले.
या सामन्यात खरेतर राणीनेच पहिल्या हाफमध्ये गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, यापूर्वी झालेल्या अनेक सामन्यांत भारतीय संघाची कामगिरी खालावलेली असल्यामुळे ही कामगिरी देखील सरस ठरली.
सामन्यात याच हाफमध्ये अर्जेंटिनाच्या फोर्शेरोने 39 व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर मात्र, त्यांनी भारतीय संघाचा बचाव भेदण्याचे अनेकदा प्रयत्न केले. अर्थात, भारताच्या बचावपटूंनी केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे यजमानांना त्यानंतर गोल करण्यात एकदाही यश आले नाही व हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
या मालिकेत भारतीय संघाने अर्जेंटिनाच्या मुख्य संघाशी बरोबरी केली असली तरीही त्यांना ब संघाकडून दोन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे या सामन्यातील कामगिरीने भारतीय संघाचा खेळ उंचावला असेच म्हणावे लागेल.