अशा धमक्या खुप येतात म्हणत उडवली खिल्ली
नवी दिल्ली – अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अल-जवाहिरीने भारताला दिलेल्या धमकीला परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी अशा धमक्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.
जवाहिरीच्या या व्हिडिओ संदर्भात रवीश कुमार यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले होते. त्यावर रवीश कुमार म्हणाले, अशा धमक्या आम्ही कायम ऐकत असतो. मला वाटत नाही की, याला खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. आमचे सुरक्षा दल पूर्णपणे तयार आहे. आमची अखंडता कायम ठेवण्यास आम्ही सक्षम आहोत. रवीश कुमार यांनी करतारपूर कॉरिडोर संदर्भातही उत्तर दिले आहे ते म्हणाले, आम्ही या पूर्वीही हा मुद्दा पाकिस्तानसमोर उपस्थित केला आहे. यात केवळ पायाभूत सुविधाच नाही तर, एका पुलाचाही समावेश आहे. पण, एक पूल व्हायला पाहिजे की, पक्का रस्ता यावर चर्चा सुरू आहे, असे मला वाटते.
दरम्यान, दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीने भारताला धमकी देणारा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यात त्यांना काश्मीरमधील दहशतवाद्यांना भारतीय सैन्यावर आणि सरकारवर सातत्याने हल्ले करण्याचा सल्ला दिला होता.