नवी दिल्ली – भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावली. तीन सामान्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अश्या फरकाने आफ्रिकेने मालिकेत वर्चस्व राखले. या दरम्यान भारताच्या दक्षिण आफ्रिकेतील पराभवानंतर चोविस तासात विराट कोहलीने कसोटी क्रिकेटचेही नेतृत्व सोडून सर्व चाहत्यांना धक्का दिला.
कसोटी क्रिकेटमध्ये कोहली एक असामान्य कर्णधार होता. त्याची कसोटी क्रिकेट कर्णधार म्हणून त्याची यशाची टक्केवारी ५८.८२ इतकी राहिली. त्याने सर्वा यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीला मागे टाकले. धोनीने सौरभ गांगुलीला मागे टाकले होते.
विराटच्या यशाची आकडेवारी
६८ कसोटी सामन
४० विजय
१७ पराभव
११ अनिर्णित
धोनीने ६० सामन्यात नेतृत्व करताना २७,तर गांगुलीने ४९ कसोटीत कर्णधार राहताना २१ विजय मिळविले.कोहलीने कर्णधाराच्या कारकिर्दीत ६८ सामन्यात ५,८६४ धावा केल्या. यात त्याने २० शतके आणि १८ अर्धशतके झळकावली. त्याची सर्वोच्च खेळी २५४ धावांची राहिली आणि त्याचा स्ट्राईक रेट ५७.५६ इतका होता.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१४ मध्ये तो कर्णधार म्हणून पहिला सामना खेळला आणि ८ वर्षांनी २०२२ मध्ये तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून अखेरचा सामना खेळला. मायदेशात तो सर्वात यशस्वी कर्णधार ठरला . त्याने गेल्यावर्षी वानखेडेवर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळविला, तो त्याचा मायदेशातला २४वा कसोटी विजय होता.