बर्मिंगहॅम – भारताच्या मिश्र बॅडमिंटन संघाला मलेशियाविरुद्ध अंतिम लढतीत झालेल्या पराभवामुळे अखेर रजतपदकावर समाधान मानावे लागले. येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू सुवर्णपदक जिंकणार असा विश्वास होता मात्र, मलेशियाने त्यांच्यावर दडपण राखत 3-1 अशा विजयासह सुवर्णपदक पटकावले.
The @birminghamcg22 silver medallists in the badminton mixed team event: #TeamIndia 🏸🇮🇳#EkIndiaTeamIndia | #B2022 | #CWG2022 pic.twitter.com/UohV61YNu2
— Team India (@WeAreTeamIndia) August 2, 2022
मिश्र सांघिक बॅडमिंटन संघाने मिळवलेल्या या रजतपदकामुळे भारताची पदक संख्या 13 झाली आहे. पुरूष दुहेरीच्या पहिल्या लढतीत मलेशियाने भारताला 1-0 असे पराभूत केले. त्यानंतर भारताची दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार महिला खेळाडू पी व्ही सिंधूने महिला एकेरीचा सामना जिंकत 1 -1 अशी बरोबरी साधली. सिंधूने महिला सिंगल्समध्ये जीन वे गो हीचा 22-20, 21-17 असा पराभव केला.
मात्र पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतला पराभवाचा धक्का बसला. त्यानंतर पुरुष दुहेरीचा झाला. त्यात भारताच्या सात्विक साईराज रांकरेड्डी आणि चिराग शेट्टीचाही पराभव झाला. तेंग फॉंग आणि वूई सोह या मलेशियन जोडीने त्यांना 21-18, 21-15 असे पराभूत केले. पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत 21-19, 6-21, 21-16 असा पराभूत झाला. त्यामुळे मलेशियाने पुन्हा 2-1 अशी आघाडी घेतली.
महिला दुहेरीत मलेशियाच्या कॉंग ली पेअरली टॅन आणि मुलरीथर थिन्नाहने भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा पहिल्या गेममध्ये 21-18 असा पराभव केला. दुसऱ्या गेममध्ये जॉली आणि गोपीचंद यांनी कडवी झुंज दिली. त्यांनी सामना 8-8 असा बरोबरीत आणला होता.
मलेशियाच्या जोडीने थाटात पुनरागमन करताना 7 गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा भारताच्या जॉली आणि गोपीचंद जोडीने सामना 17-18 असा रंगतदार स्थितीत आला असताना मलेशियाच्या संघाने वर्चस्व राखत हा सामना 21-17 असा जिंकत सुवर्णपदक पटकावले.