टोकियो – भारताचा पुरुष व महिला हॉकी संघ टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरल्याने आनंदाच्या वातावरणात दोन्ही संघ जपानमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या दोन मोसमांपासून सातत्याने सरस कामगिरी करत असलेल्या या दोन्ही हॉकी संघांकडून यंदा पदकाची आशा आहे.
ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत पटकावलेल्या 28 पदकांपैकी सर्वाधिक 11 पदके हॉकीमधील आहेत. मात्र, 1980 सालानंतर जवळपास चार दशकांत भारताला ऑलिम्पिकचे पदक मिळवता आलेले नाही. यंदा मनप्रीत सिंग आणि राणी रामपाल यांच्या नेतृत्वाखाली भारताचे दोन संघ गतवैभव परत मिळवण्यासाठी अथक मेहनत घेत टोकियोत दाखल झाले आहेत.
2019 साली आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचा वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूचा पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय हॉकीपटू मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली पुरुष संघ पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय महिला संघाने 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकनंतर आतापर्यंतच्या 95 सामन्यांत 48 सामने जिंकले आहेत.
भारतीय पुरुष संघ –
पीआर श्रीजेश, हरमनप्रीत सिंग, रूपिंदर पाल सिंग, सुरेंदर कुमार, अमित रोहिदास, वीरेंद्र लाक्रा, हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, निलकांता शर्मा, सुमित, समशेर सिंग, दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग, ललितकुमार उपाध्याय, मनदीप सिंग.
भारतीय महिला संघ –
सविता, दीप ग्रेस ईक्का, निक्की प्रधान, गुरजित कौर, उदिता, निशा, नेहा, सुशीला चानू पुख्रमम, मोनिका, नवज्योत कौर, सलिमा तेटे, राणी, नवनीत कौर, लालरेम्सियामी, वंदना कटारिया, शर्मिला देवी.