पुणे –करोना संकटात लस निर्मितीचे प्रयोग सुरू होते. त्याच काळात भारतात लस निर्मिती वेगाने केली जात होती. चीन-अमेरिकेसारख्या महासत्ता जिथं हतबल होत्या, तिथं भारतानं लस निर्मितीही केली आणि आपल्या नागरिकांसह जगभरातील सुमारे 100 देशांना ती पुरवलीदेखील. या सर्वांत मोलाचे योगदान राहिले, ते शास्त्रज्ञ, औषध निर्मिती कंपन्या आणि पुरवठादार साखळी. विशेष म्हणजे, भारतीय लसी इतरांच्या तुलनेत प्रभावी ठरल्याचे निरीक्षणही नोंदवले जात आहे.
गरीब राष्ट्रांसाठी पुढाकार
भारताने शेजारील राष्ट्रांसह गरीब राष्ट्रांनाही मोफत लस पुरवली. यात आफ्रिकेतील नायजेरिया, कंबोडिया, रवांडा आदी देशांसह नेदरलॅंड्स, संयुक्त अरब अमिरातीसारख्या अतिश्रीमंत देशांचाही समावेश आहे.
लस निर्मितीचे केंद्र पुणे
करोना प्रतिबंधक लसींत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीचे मोठे योगदान राहिले आहे. सीरमने ऑक्सफर्ड विद्यापीठाशी करार करत कोविशिल्ड, तर भारत बायोटेकने स्वतंत्रपणे कोवॅक्सिन ही लस विकसित केली आहे. तुलनेने सीरमची लस उत्पादन क्षमता अधिक आहे. त्यामुळे लस निर्मिती आणि पुरवठ्यात पुणे शहराचे मोठे योगदान राहिले आहे. शिवाय, अमेरिकेतील कंपनीशी करात करत कोवोवॅक्स लसीची निर्मिती आणि पुरवठादेखील केला आहे.
“गावी’ संघटनेची मदत
श्रेलरश्र अश्रश्रळरपलश षीे तरललळपशी रपव र्खीापळूरींळेप- अतख या संघटनेच्या मदतीने भारताने ही मदत केली आहे. “सर्वांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी’ ही या आंतरराष्ट्रीय संघटनेची भूमिका आहे. या संघटनेच्या माध्यमातून भारताने 67 देशांना लस पुरवली आहे. तर, गरीब आणि अविकसित राष्ट्रांसाठी या संघटनेने विविध माध्यमांतून सुमारे 150 मिलियन डॉलर्सची मदत करोना निर्मूलनासाठी केली आहे.
“वॅक्सिन मैत्री’
भारतातील करोना प्रतिबंधक लस निर्मिती आणि निर्यात क्षमता लक्षात घेऊन केंद्र सरकारने अनेक राष्ट्रांना लस पुरवली. त्यात 48 देशांना सुमारे 15 मिलियन डोस “गिफ्ट’ म्हणून पुरवले गेले आहेत. यातून दोन देशांत मैत्रीचा नवा अध्याय भारताने सुरू केला. तर, व्यावसायिक किंवा करार म्हणून भारताने सुमारे 100 देशांना 1850.280 मिलियन डोस पुरवले आहेत.
भारताने लस पुरवलेले प्रमुख 10 देश
बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, भूतान, मालदिव्ज, मॉरिशस, सेशल्स, श्रीलंका, बहरिन, ब्राझील