अहमदबाद – सामना कोणताही असो, खेळपट्टी कोणतीही असो, तुमचे तंत्र भक्कम असेल तर शतकी खेळी साकार होतात, असे मत भारताचा नवोदित फलंदाज व शतकवीर फलंदाज शुभमन गिल याने आपल्या न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यातील शतकी खेळीचे समीक्षण केले.
माझ्या खेळीचे वर्णन करायचे झाले तर ही एक आक्रमक परंतु तंत्रशुद्ध खेळी होती. या खेळीमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघाकडून क्रिकेटच्या तीनही प्रकारात डावाची सुरुवात करताना असेच वर्चस्व राखण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. माझे शतक साकार झाले असले तरीही त्यात कर्णधार हार्दिक पंड्याचे सल्लेही मोलाचे ठरले.
जेव्हा मी चौकार किंवा षटकार मारत होतो त्यावेळी तो प्रत्येक वेळी पुढील चेंडू सावधपणे खेळ असेच म्हणायचा. याचे कारण म्हणजे चेंडूच्या दर्जानुसार फलंदाजी कर असेच त्याला म्हणायचे होते व ते मी ऐकले, असे गिलने सांगितले.
Pune : कसबा विधानसभा निवडणूकीत नवा ट्विस्ट; कुणाल टिळक यांची…
आक्रमकपणामुळेच न्यूझीलंडवर दडपण
माझीच नव्हे तर संघातील सर्व फलंदाजांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळेच न्यूझीलंडवर पहिल्या षटकापासून दडपण आले व ते अखेरपर्यंत कायम राहिले. कोणत्याही संघाला नमवण्यासाठी त्यांच्या गोलंदाजावर दडपण आणणे महत्त्वाचे असते व त्यात आम्ही यशस्वी ठरलो त्यामुळेच आम्ही ही मालिका जिंकू शकलो, असेही गिलने म्हटले आहे.