नवी दिल्ली : भारतातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 649वर जाऊन पोहोचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रात्री आठ वाजता स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू गुरूवारी दुपारी झाला. तर नवी मूंबईत एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 16 वर जाऊन पोहोचली. गुजरात, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशात एक बळी नोंदवण्यात आला.
केंद्र सरकारच्या यादीत प्रथमच गोव्याचे नाव नोंदवले गेले. तेथे 33 बाधित असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रात आतापर्यंत चार जणांचे प्राण गेले आहेत. गुजरातमध्ये दोन, मध्यप्रदेश, तामिळनाडू, बिहार, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि हिमाचल प्रदेशमध्ये नोंदवला आहे.
सध्या प्रत्यक्ष कोरोनाचे बाधित असणारे 6333 असून 44 जण या संसर्गापासून बरे झाले आहे. बाधितांमध्ये 47 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.