इस्लामाबाद : पाकिस्तानात अडकलेल्या 748 भारतीयांच्या परतीच्या प्रवासास गुरूवारपासून सुरवात होईल. येथील भारतीय दुतावास या नागरिकांच्या संपर्कात आहे.
वाघा सीमेवरून या नागरिकांचा भारतात प्रवेश होईल. या नागरिकांच्या नावाची यादी संबंधित विभाग आणि पंजाब रेंजर्सला देण्यात आली आहे. हा प्रवास मंगळवारी सुरू होणार होता. मात्र, नंतर तो गुरूवारी निश्चित करण्यात आला. या भारतीयांच्या प्रवेशासाठी 25 ते 27 जून या काळात सीमा खुली ठेवण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात 25 जून रोजी 250 भारतीय मायदेशी येतील. तर दुसऱ्या टप्प्पात शुक्रवारी 248 जण परततील. उर्वरित नागरिक शनिवारी येतील, अशी माहिती भारतीय दुतावासाकडून देण्यात आली. या भारतीयांच्या सुखकर प्रवासासाठी पाकिस्तानी प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत.
पाकिस्तातून आलेल्या नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये रहावे लागेल. जम्मू काश्मिर, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधील नागरिकांना त्यांच्या राज्यात क्वारंटाईन व्हावे लागेल.