पुणे – नेहमी वैविध्यपूर्ण कथा, विषय मांडणारे अशी लेखक-दिग्दर्शक ‘महेश मांजरेकर’ यांची सिनेसृष्टीत ओळख आहे. त्यांनी सिनेव्यवसायाची गरज म्हणून व्यावसायिक सिनेमे बनवले; पण समाजातील वास्तविकता पडद्यावर प्रतिबिंबित करणारे मार्मिक सिनेमेही त्यांनी निर्मित आणि दिग्दर्शित केले.
आता पुन्हा एकदा समाजाला आरसा दाखवणारा एक सिनेमा मांजरेकर घेऊन आले आहेत. “नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं या सिनेमाचं नाव आहे. नुकताच, हा सिनेमाचा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
“नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ सिनेमातील काही सीन आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्ये काढण्यात यावीत, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. अश्यातच, आता भारतीय स्त्री शक्ती आणि आयएमएच्या कार्यकर्त्यांनी लातूर येथे हा सिनेमा बंद पाडला आहे. भारतीय स्त्री शक्ती संघटनेने मुंबई ,नागपूर, लातूर, पुणे अशा विविध ठिकाणी या सिनेमाच्या
विरोधात लेखी तक्रार पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तसेच राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या प्रमुख प्रियंका कांगो यांनीही मांजरेकर यांना नोटिस पाठविली आहे.
दरम्यान, हा सिनेमा दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा सिनेमा आधारित असून सिनेमाची पटकथा आणि दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी महेश यांनी सांभाळली आहे.