गुवाहाटी – भारतीय संघाचा कर्णधार हिटमॅन ‘रोहित शर्मा’ याने आपल्या कारकीर्दीत एक विक्रमी टप्पा पार करताना चारशे टी-20 सामने खेळण्याची कामगिरी केली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी गुवाहाटीत खेळला गेला. याच सामन्यात रोहितने हा मैलाचा दगड पार केला.
400 टी-20 सामने खेळणारा रोहीत भारताचा पहिलाच तर जगातील नववा क्रिकेटपटू ठरला. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम सलामीवीर रोहितच्या नावावर आहे. भारतीय कर्णधाराने आतापर्यंत 400 टी-20 सामने खेळले आहेत.
रोहित शर्मा, दिनेश कार्तिक व महेंद्रसिंह धोनी या तीनच भारतीय क्रिकेटपटूंनी टी-20 क्रिकेटमध्ये 350 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-20 सामने खेळण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कॅरन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत 614 सामने खेळले आहेत.
5त्यानंतर वेस्ट इंडीजचाच ड्वेन ब्राव्हो (556), पाकिस्तानचा शोएब मलिक (481), वेस्ट इंडीजचा ख्रिस गेल (463) व सुनील नरेन (435), इंग्लंडचा रवी बोपारा (429), वेस्ट इंडीजचा आंद्रे रसेल (428) व दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर (402) यांचा क्रमांक लागतो.