नवी दिल्ली – सध्या सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे भारतीय रेल्वेने अधिक विशेष गाड्या चावण्याचा निर्णय घेतला आहे. दसरा, दिवाळी सणानिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी 24 विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्यांच्या 156 फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेने ट्विटद्वारे दिली आहे.
To clear the rush during the forthcoming festive season, WR will run 156 trips of 12 more Festival Special trains to various destinations.
All of these trains will run as fully reserved trains. #specialtrains pic.twitter.com/dOEFo60xWS
— Western Railway (@WesternRly) October 16, 2020
पश्चिम रेल्वेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 12 जोड्या विशेष गाड्यांपैकी 5 जोड्या वांद्रे टर्मिनसहून, 2-2 जोड्या इंदूर आणि अधनाहून धावणार आहेत. तर प्रत्येकी 1-1 जोड्या पोरबंदर व गांधीधाम स्टेशनहून धावणार आहेत. तसेच या सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहेत.
तसेच पूर्णपणे आरक्षित असलेल्या या गाड्यांचे बुकिंग 17 ते 22 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. असेही पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.