रांची : भारताच्या भावना जाटने शनिवारी येथे राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये २० कि.मी. चालण्याची शर्यत प्रकारात नवीन राष्ट्रीय विक्रम नोंदवल्यानंतर २०२० च्या आॅलिम्पिकसाठी तिने पात्रता मिळविली.
आॅलिम्पिक पात्रता वेळ १:३१:०० अशी असताना राजस्थानच्या राजसन्मद जिल्ह्यातील काब्रा नामक छोटेखानी गावामधील एका गरीब शेतकरी कुंटुबातील भावना जाट या खेळाडूने १:२९:५४ अशी वेळ नोंदविली.
Big result in Women's 20km, Bhawna Jat of #Rajasthan clocks 1:29.54 (Olympic Qualification time- 1:31.00)
7th National #RaceWalk Championships 2020 #Ranchi
Priyanka Goswami narrowly miss Oly Q as she clocked 1:31.36@BhutaniRahul @g_rajaraman pic.twitter.com/ChtUexgIuw
— Athletics Federation of India (@afiindia) February 15, 2020
गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये केलेल्या तिच्या १:३८:३० च्या सर्वोत्कृष्ट कामगिरीवर भावनाच्या निकालात मोठी वाढ झाली होती. तर, प्रियंका गोस्वामी १:३१:३६ च्या वेळेसह आॅलिम्पिक निकषांमध्ये कमी पडली. वर्ष २०२० चे आॅलिम्पिक २४ जुलै ते ९ आॅगस्ट टोकियो येथे आयोजित केले जाणार आहे.