संयुक्त राष्ट्रे – संयुक्तराष्ट्रांच्या विविध ठिकाणी तैनात असलेल्या शांती सेनेत मोलाचे योगदान देणाऱ्या 119 लष्करी अधिकारी व जवानांना युएन मेडल देऊन सत्त्कार केला जाणार आहे. त्यात भारतीय जवान जितेंद्रकुमार यांचाहीं समावेश असून त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार आहे. त्यांनी कांगोत शांतीसेनेत काम करीत असताना आपल्या प्राणाची बाजी लावली. त्यांना डॅग हॅमेरस्कजोल्ड मेडल देऊन मरणोत्तर सन्मानीत केले जाणार आहे. भारताचे संयुक्तराष्ट्रांतील कायम प्रतिनिधी सय्यद अकबरूद्दीन हे त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.
संयुक्तराष्ट्रांच्या शांतीसेनेत भारताचे सध्या एकूण 6400 लष्करी व पोलिस जवान सेवा देत असून संख्या बळाच्या आधारे शांतीसेनेत योगदान देणारा भारत हा चौथ्या क्रमांकाचा देश आहे. या सेवेत काम करताना आत्तापर्यंत भारताचे 163 जवान कामी आले आहेत. गेल्या 70 वर्षातील ही सर्वाधिक संख्या आहे. 1948 पासून संयुक्तराष्ट्रांतर्फे विविध राष्ट्रांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या कामी शांती सेना पाठवली जाते. त्यात आत्तापर्यंत एकूण 3737 जवान शहीद झाले आहेत. त्यात भारतीय शहीद जवानांची संख्या 163 इतकी आहे.