नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेतून नेमबाजी क्रीडा प्रकार वगळल्यामुळे आकम्रक झालेल्या भारतीय ऑलिम्पिक महासंघाने दोन पाऊले मागे घेत बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय मागे घेतला. त्यामुळे भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.
The Indian Olympic Association held its Annual General Meeting today at the Olympic Bhawan in New Delhi. The house together reviewed and decided on governance matters and other agendas, including the decision to participate in the #Birmingham2022 #CommonwealthGames! pic.twitter.com/KnUfaMRSMe
— Team India (@WeAreTeamIndia) December 30, 2019
याचसोबत नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत महासंघाने २०२६ किंवा २०३० साली होणा-या राष्ट्रकुल स्पर्धांच्या यजमानपदाच्या शर्यतीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रकुल महासंघानेही भारताच्या या निर्णयाबदल आनंद व्यक्त केला असून त्या बदल्यात राष्ट्रकुल नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भारताला दिले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.