गोरखपूर : भारतीय संविधानाने प्रेत्येक भारतीयाला राजा बनवले आहे. परंतु भारतीय नागरिकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे, असे राष्टीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोरखपूर इथे बोलताना सांगितले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त सरस्वती शिशू मंदीर माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, प्रत्येक भारतीयांनी सुरवीरांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. नागरिकांनी अधिकाराबरोबरच आपल्या कर्तव्याचे पालन करायला हवे, तेव्हाच नवीन भारत निर्माण होईल असेही भागवत म्हणाले.
शिक्षणाचा वापर योग्य प्रकारे करायला हवा तेव्हाच भारताला विकासाच्या मार्गावर पुढे नेता येईल असे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय स्वयं सेवक संघ समाजातील गरीब जनता संघाची माणसे आहेत. धनाचा उपयोग गरिबांसाठी करायला हवा, बाळाचा वापर दुर्बलांच्या संरक्षणासाठी विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.