नवी दिल्ली – भारतात प्रचलित असलेल्या विविध कामगार कायद्याप्रमाणे नोकरदार व्यक्तींना किंवा कामगारांसाठी रजा मिळणे हा हक्क असला तरी या हक्काची अंमलबजावणी करताना सुद्धा नोकरदार व्यक्ती घाबरतात असा निष्कर्ष एका संस्थेच्या अहवालात समोर आला आहे.
नोकरी जाण्याच्या भीतीने अनेक लोक रजा मागताना संकोच करतात असे या अहवालात म्हटले आहे रँड स्टॅन्ड इंडिया या संस्थेने हा अहवाल केला असून 35 ते 40 टक्के कर्मचारी रजेचा अर्ज देताना घाबरतात असा निष्कर्ष या संस्थेने आपल्या अहवालात काढला आहे रजा घेतली तर कार्यालयातील आपले महत्त्व कमी होईल या भीतीने पंचवीस टक्के कर्मचारी रजेवर जाण्याचा विचारच सोडून देतात असेही या अभ्यासात म्हटले आहे.
ठराविक दिवस काम केल्यानंतर रजा घेणे हा नोकरदारांचा अधिकार असला तरी केवळ भीतीच्या भावनेतून अनेक नोकरदार हा आपला अधिकार पूर्ण करत नाहीत नोकरदारांनी खूप आधी नियोजन केले तर ऐनवेळी कार्यालय प्रमुखाकडे जाऊन रजा घेताना भीती वाटणार नाही असा सल्ला आता तज्ञांनी दिला आहे एखादा नोकरदार व्यक्ती रजेवर जातो तेव्हा त्याचे काम कोणी करायचे हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि त्याच एका कारणसाठी कार्यालय प्रमुख रजा नाकारण्याचा निर्णय घेऊ शकतात.
पण नोकरदारांनी रजेचा अर्ज देताना जर अशा प्रकारचा पर्याय कार्यालय प्रमुख समोर उपलब्ध करून दिला तर रजेचा मार्ग सुकर होऊ शकतो असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका अहवालाप्रमाणे भारतातील 75 टक्के नोकरदारांना आपण खूपच कमी प्रमाणात सुट्टी घेतो असे वाटते सुटी न घेतल्यामुळे सुट्टी न मिळाल्याच्या तणावामुळे अनेकांचे आरोग्यही बिघडत असल्याचा इशारा या तज्ञांनी दिला असून ठराविक दिवस काम केल्यानंतर ठराविक दिवस सुट्टी घेणे योग्य ठरेल असेही सुचवले आहे.