Asia Cup 2023 – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गुरुवारी जीवघेणा हल्ला झाला. पंजाब प्रांतात त्यांच्या कंटेनर-ट्रकवर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार केला. या गोळीबारात इम्रान खान यांच्या दोन्ही पायाला जखम झाली आहे. या घटनेत इम्रान यांच्याव्यतिरिक्त आणखी काही ज्यांना जखमा झाल्या असल्याचे समोर आले आहे. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही समूहाने किंवा संघटनेने स्वीकारलेली नाही. या घटनेनंतर पुन्हा एकदा क्रिकेट जगतात आशिया चषक २०२३ ( Asia Cup 2023 ) बाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे. कारण ही स्पर्धा पाकिस्तानात खेळवली जाण्याची शक्यता होती.
#T20WorldCup : बांगलादेश मंडळ करणार कोहलीची तक्रार; ICC काय निर्णय घेते याकडे लक्ष…
इम्रान खान यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर भारतीय चाहत्यांकडून २०२३चा आशिया चषक ( Asia Cup 2023 ) पाकिस्तानात न खेळवता तटस्थ ठिकाणी खेळवावा, अशी मागणी केली जात आहे. त्याचबरोबर खेळाडूंची सुरक्षा व्यवस्था कडेकोट असेल अशा तटस्थ ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे, अशीही मागणी होत आहे. घटनास्थळावरून गोळीबार करणाऱ्या एक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
इम्रान खान यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्यानंतर २०२३च्या आशिया कप ( Asia Cup 2023 ) स्पर्धेबाबत भारतीय क्रिकेट चाहते ट्विटरवर सतर्क झाले आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेला पाहता ही स्पर्धा पाकिस्तानात खेळवू नये, अशी मागणी केली जात आहे. याअगोदरही आशिया कप स्पर्धेवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यात चांगलीच बाचाबाची रंगली होती. एसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यापूर्वीच २०२३ चा आशिया चषक ( Asia Cup 2023 ) तटस्थ ठिकाणी होईल असे म्हटले होते.
Sorry, after incident of #ImranKhan
In my opinion Indian cricket team should not to travel Pakistan for #AsiaCup2023Whats your?
— Aniket Anjan 🇮🇳🇮🇳 (@AnjanAniket) November 3, 2022
You can understand why #AsiaCup2023 requires a neutral venue.#ImranKhan #T20WorldCup
— menda (@vj_corp) November 3, 2022
A country where Ex-PM is not safe, expects India to send their Cricket team #AsiaCup2023 #BCCI #PCB #ImranKhan #ramizraja
— Ravindar pal Singh (@RavindarpalSi15) November 3, 2022