नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय सीमेवर पुन्हा एकदा भारत आणि चीनचे जवान समोरा-समोर आले असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत दोन्ही देशांचे जवान जखमी झाले आहेत. ही घटना उत्तर सिक्कीमच्या नाकूला सेक्टरमध्ये घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याला भारतीय लष्कराकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.
उत्तर सिक्कीमच्या नाकूला सेक्टरमध्ये दोन्ही देशाचे जवान गस्त घालत असताना ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही देशांच्या जवानांकडून आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला त्यानंतर ही घटना घडली असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत दोन्हीकडचे जवान किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, स्थानिक स्तरावर या प्रकरणाला मिटवण्यात आले आहे. अशी घटना बऱ्याच दिवसानंतर झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.