नवी दिल्ली – इंग्लंडविरुद्ध 7 बाद 759 हा उच्चांक तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वबाद 36 असा नीचांक. हा योगायोग भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे.
अर्थात, चार वर्षांत हे दोन्ही योग जुळून आले आहेत. 19 डिसेंबर 2016 साली उच्चांक तर 19 डिसेंबर 2020 साली नीचांक असा योगायोग कोहलीच्या संघाच्याबाबत घडला आहे.
चार वर्षांपूर्वी कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरुद्ध 7 बाद 759 असा धावांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात इंग्लंडला एक डाव व 75 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. तर, 19 डिसेंबर याच दिवशी या वर्षी भारतीय संघाच्या नावे नीचांक नोंदला गेला.
ऍडलेडवर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केवळ 36 धावा करता आल्या. पाच दिवसांचा कसोटी सामना केवळ तीनच दिवसांत भारताने गमावला.