नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेसने मोदींवर टीकेचा भडीमार सुरु केला आहे. राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना भारतीय नौदलाच्या INS विराटचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केला, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला होता. दरम्यान काँग्रेसने याला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय वायूदलाच्या विमानांचा स्वस्तात वापर करून घेतला. असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी काही बातम्यांचा देखील पुरावा दिला.
तसेच माहितीच्या अधिकारात मिळालेली माहिती देखील सुरजवाला यांनी सांगितली. “नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशांतर्गत प्रवासातील २४० अनौपचारिक फेऱ्यांसाठी भारतीय वायूदलाच्या विमानांचा वापर करण्यात आला. यासाठी भाजपने वायूदलाला १.४ कोटी इतकी रक्कम दिली. आणि काही ठिकाणी विमानांसाठी आकारण्यात आलेले भाडे खूपच कमी होते. १५ जानेवारी २०१९ रोजी ‘एच/पी बालांगीर-एच/पी पाथरचेरा’ प्रवासासाठी तर भाजपला अवघे ७४४ रुपये मोजावे लागले”
ते समोर म्हणाले, दिशाभूल आणि खोटेपणा हा तुमचा शेवटचा आधार आहे. तुम्ही भारतीय वायूदलाच्या विमानांचा वापर एखाद्या टॅक्सीप्रमाणे केलात. काही ठिकाणी तर एका विमानाच्या एका फेरीसाठी वायूदलाला अवघे ७४४ रुपये देण्यात आले. स्वत:च्या पापांची भीती आता तुम्हाला सतावत आहे. तरीही तुम्ही निर्ल्लजपणे दुसऱ्यांकडे बोट दाखवत आहात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वताला मिस्टर क्लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते त्यावर कॉंग्रेसकडून तीव्र टीका करण्यात आली होती.
Modiji,
Distraction & Fakery is your last resort
You have made Indian Air Force jets your own Taxi!
You have paid as low as ₹744 for using IAF jets for election trips!
Scared of your own sins haunting u, you are shamelessly pointing fingers on others! https://t.co/6VD4ZbJsBQ
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 9, 2019